Tuesday, 17 January 2012

डोळे बर्फ होतात तेव्हा...

सभोवती घडणा-या घटना पाहून संवेदनशील मन व्यथीत होते.
जीव घुसमटू लागतो.
सतत अन्याय सहन करणारे मन पेटून उठते.
परंतु प्रतिकुल परिस्थितीमुळे त्याचे बंड अयशस्वी होते.
मग अशी व्यक्ती निराश होते.
अन्याय करणारा अधिकच मुजोर बनत जातो.
शोषित व्यक्ती आणि त्याच्यासोबत काम करणारे त्याचे सहकारी मूक साक्षीदार बनतात.
रोज गुलामीत जगण्याचा अनुभव घेणा-या व्यक्तींच्या डोळ्यांतील आग पार विझून जाते अन् त्याचे डोळे बर्फ होतात तेव्हा ... क्रांतीची आठवण होते.

No comments:

Post a Comment